आजपर्यंत ६६ विक्रमी पुरस्कारांचे मानकरी.
पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवल्याने आतापर्यंत ६६ पुरस्कार पटकावले आहेत. पर्यावरण विभागाच्या वतीने भूमी, वायू, अग्नी, जल आणि आकाश या पंचतत्वावर आधारित हे अभियान राबविण्यात आले होते. एप्रिल २०२२ ते मे २०२३ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या अभियानामध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले.
यामध्ये प्रदुषणमुक्त व फटाकेमुक्त संकल्पना, व्रक्षलागवड, दुर्मिळ वनस्पतींचे जतन संवर्धन, रंगरंगोटी, पर्यावरण बाबत विविध स्पर्धा, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू, जनजागृती प्रबोधन यासह कचऱ्ऱ्यापासून खत निर्मिती आदी उपक्रम प्रभावीपणे राबवल्याने शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या वतीने हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. पन्नास लाख रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
या यशाबद्दल राज्याचे उत्पादन शुल्क तथा सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, गटविकास अधिकारी गोरख शेलार, यशदाचे मल्लिनाथ कलशेट्टी, राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानचे संचालक आनंद भंडारी आदींनी अभिनंदन केले.
__________________________________
ग्रामविकासातील विविध उपक्रमांच्या माध्यमातून मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने नवी दिशा देण्याचा नेहमीच प्रयत्न केला. गावकऱ्यांनी पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण केल्यानेच हा गौरव झाला. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्याचे आव्हान गावकऱ्यांनी यशस्वीपणे पेलले. अन्य गावांनी ही यासाठी पुढाकार घ्यावा.
सरपंच ग्रा.पं.मान्याचीवाडी