मारुतीराव मोळावडे ‘महाराष्ट्र सन्मान २०२३ ' पुरस्काराने सन्मानित.

खा. श्रीनिवास पाटील, आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, राजा माने यांची उपस्थिती.



कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
पाटण तालुक्यातील कुठरे - मोळावडेवाडी (मोरेवाडी) गावचे सुपुत्र, मोरेवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य, तळमावले (ता. पाटण) येथील जनसहकार निधी लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष आणि सहकार क्षेत्रातील अतिशय अभ्यासू व लोकप्रिय व्यक्तिमत्त्व मारुतीराव मोळावडे यांनी अतिशय खडतर परिस्थितीतून वाटचाल करत सामाजिक, सहकार क्षेत्रामध्ये  भक्कम स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत जनसहकार निधी लिमिटेड ही आर्थिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था व्यापारी, बेरोजगार आणि सर्वसामान्य जनतेचा आधार बनली आहे.

सामाजिक व सहकार क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणारे मारुतीराव मोळावडे यांना राजधानी सातारा येथे सन्मानपूर्वक महाराष्ट्र सन्मान २०२३ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजधानी सातारा येथे महाराष्ट्र लाईव्ह न्युज चॅनल च्यावतीने 'महाराष्ट्र सन्मान २०१३' हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला, या सन्मान सोहळ्यासाठी सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व वरिष्ठ संपादक माध्यम तज्ञ व डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, भाजपा नेते मनोज दादा घोरपडे, कोरेगाव पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे उपस्थित होते.

मारुतीराव मोळावडे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

यावेळी सातारा,सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, साहित्यिक, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातील १४ मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यावेळी यशवंत संभाजीराव पाटणे ( प्रतिभावंत लेखक व व्याख्याते, डॉ. राजेंद्र नानासो सरकाळे (मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सातारा), हिंदुराव शंकरराव पाटील (माजी कृषी सभापती जिल्हा परिषद सातारा), विकास दिलीपराव थोरात, रेल्वे लढयाचे प्रवर्तक , (तारगांव, ता. कोरेगांव जि सातारा, श्रीमती संघमित्रा भिमराव ढापरे सेवानिवृत्त मुख्यादयापिका ( मु.पो. कापील ता कराड जि सातारा), मंगेश सुभाष पाटील, कोल्हापूर (उपकार्यकारी अभियंता), कु. मोहित संतोष जगताप अथलेटिक्स खेळाडू (निगडी ता. कोरेगांव जि सातारा), अजित सिताराम सांडगे उद्योजक, कराड (आगाशिवनगर, कराड जि. सातारा), राजू सर्जेराव शेळके (जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सातारा) जावळवाडी पो. वेणेगाव, ता. जि. सातारा, मारुतीराव शिवराम मोळावडे सदस्य, सातारा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) मु.मोळावडेवाडी, पो. कुठरे, ता. पाटण जि.सातारा, ह.भ.प. डॉ. सुहास नथुराम फडतरे महाराज (कुमठे, ता. कोरेगांव जि. सातारा ).

उमेश हिंदुराव बांबरे दैनिक सकाळ सह मुख्य बातमीदार (मु पो भरतगांववाडी ता जि सातारा), सुहास जगन्नाथ माने (कृषी) मु.पो. राहुडे, ता. पाटण जि. सातारा, ओंकार तानाजी डांगे उपकार्यकारी अभियंता यांना महाराष्ट्र सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, महाराष्ट्राच्या जडणघडणीत सातारा जिल्ह्याचे योगदान खूप मोलाचे असून या सातारा जिल्ह्यातील कर्तृत्ववान १४ हिऱ्यांचा होणारा सत्कार म्हणजे राजधानी सातारा साठी गौरवशाली बाब आहे आपल्या सातारा जिल्ह्याचे नाव जगाच्या पातळीवर पोहोचवण्यासाठी आजच्या तरुण पिढीने पुढाकार घ्यावा यासाठी सर्वतोपरी आमचे सहकार्य राहील. वरिष्ठ संपादक व माध्यम तज्ञ राजा माने यावेळी म्हणाले देशभरात बदलत्या तंत्रज्ञानामुळे मीडिया क्षेत्रात देखील मोठा बदल झाला असून डिजिटल मीडिया आता नवी झेप घेत आहे. 

या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून नव्या दिशा देखील समाजाला मिळत आहेत राजधानी साताऱ्याचा इतिहास जगासमोर मांडण्याचे काम डिजिटल मीडिया नक्की करेल व तरुण पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कारासारखे विविध उपक्रम राबवावेत यावेळी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मनोजदादा घोरपडे, माजी जिल्हा परिषद सदस्य हिंदुराव पाटील, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, डॉ. राजेंद्र सरकाळे, यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र लाईव्ह न्युज चॅनलचे संपादक विकास भोसले यांनी केले, सूत्रसंचालन वसुंधरा खांडके यांनी केले तर आभार प्रतिक भोसले यांनी मानले.

१४ हिरे म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचे आयडॉल

महाराष्ट्र सन्मान २०२३ पुरस्काराने सन्मानित झालेले १४ हिरे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील आयडॉल असून आपापल्या क्षेत्रात उच्च कामगिरी करणारे व्यक्तिमत्व आहे. राजधानी सातारा मध्ये महाराष्ट्र सन्मान सोहळा होत असून ही परंपरा कायम राहावी यासाठी सर्वतोपरी सहकार्य सर्वांचे असेल असा विश्वास सिकीम राज्याचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केला.