माजी विद्यार्थी स्नेहमेळावा व शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे कृतज्ञता पुरस्कार वितरण सोहळा उत्साही वातावरणात संपन्न.

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

काकासाहेब चव्हाण कॉलेज तळमावले या संस्कार केंद्राचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा व शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे कृतज्ञता पुरस्कार वितरण सोहळा आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न झाला. या समारंभाचे प्रमुख पाहूणे म्हणून प्राचार्य अभयकुमार साळुंखे (कार्याध्यक्ष, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर) आपल्या भाषणात म्हणाले, ज्या महाविद्यालयामुळे आपण घडलो त्या संस्कार केंद्राप्रती माजी विद्यार्थ्यांची त्यागाची भावना पाहून आपण भारावून गेलो. प्राचार्य पी. यु. शेठ, मा. एस. के. कुंभार यांच्यासारखे अनेक समर्थ नेतृत्व करणारे गुरूदेव कार्यकर्ते तळमावल्याच्या निसर्गाशी एकरूप झाले. त्यांच्या श्वासातून, कष्टातून, तपश्चर्येतून नागटेकडीचे नंदनवन झाले. चांगला शिक्षक चांगल्या विद्यार्थ्याला जन्म देतो. संगीताच्या लयीत, तालात जो डुलतो तो खऱ्या अर्थाने जीवन जगतो. आजच्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने कौटुंबिक वातावरण तयार झाले असे ते म्हणाले. *कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य पी. यु. शेठ हे होते.* या *कार्यक्रमासाठी मा. कौस्तुभ गावडे, मा. एस. के. कुंभार, मा. आर. के. भोसले, तसेच संस्था पदाधिकारी, माजी प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी -विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.* मा. अभयकुमार साळुंखे पुढे म्हणाले, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि थोर देशभक्त स्वातंत्र्यसेनानी काकासाहेब चव्हाण या द्रष्टया नेतृत्वाने काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले या ज्ञानवृक्षाची स्थापना १९६९ केली. तेव्हापासून असंख्य विद्यार्थी -विद्यार्थिनींच्या स्वप्नरुपी पंखांना बळ देण्याचे काम या महाविद्यालयाने निष्ठापूर्वक केले आहे. या महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात आपले बहुमोल योगदान देत आहेत. याचा संस्थेला सार्थ अभिमान आहे. कॉलेजला माजी प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी - विद्यार्थिनींची समृद्ध परंपरा लाभली आहे. येथील गुरुदेवांचे स्थान विद्यार्थ्यांच्या जीवनात ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ व अटळ आहे. याचा प्रत्यय या कार्यक्रमाच्या निमित्ताने आला. यावेळी साहित्य, क्रीडा, शिक्षण, कला, सहकार, शेती आदी क्षेत्रात नैपुण्य प्राप्त केलेल्या मान्यवर माजी विद्यार्थी -विद्यार्थिनिंना *शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे कृतज्ञता पुरस्कार*देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये *मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे , मा. अँड जनार्दन बोत्रे, मा. डॉ. संदिप डाकवे, मा. रविंद्र माने, मा. प्राचार्य आर. के. भोसले, मा. शंकर ढोणे तथा आनंद विंगकर , मा. अँड राम होगले, मा. हंबीरराव देसाई सर, मा. संभाजी साळुंखे, मा कुसूमताई करपे, मा. सर्जेराव यादव, मा. प्राचार्य पी. यु. शेठ , मा. प्रा. डॉ. बाबुराव गुरव , मा. एस. के. कुंभार , कै. प्राचार्य व्ही.बी.सासनुर, मा. पोपटराव देशमुख , प्रा. सी. टी. चिकमठ इ.मान्यवरांचा समावेश होता.* याप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत प्रा. बाबुराव गुरव, प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, संभाजी रामचंद्र साळुंखे, अॅड. राम होगले यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य पी. यु. शेठ सर (आजीव सेवक स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर) म्हणाले, आयुष्यात आनंदाचे उत्सव फार कमी अनुभवायला मिळतात. माझ्या १० वर्षाच्या तळमावल्याच्या काळात अनेक आनंदाचे उत्सव अनुभवता आले. 

या काळात अनेक विचारवंतांचा सहवास लाभला. माझ्यामते शिक्षक, प्राचार्य यांना जगदीशचंद्र बोस यांचा डोळा तर रवींद्रनाथ टागोरांचे हृदय असायला हवे. त्यांच्याच हातून नवनिर्मिती घडते. अनेक वर्षानंतरची गुरूजन - विद्यार्थी -विद्यार्थिनिंच्या अनोख्या भेटीने सर्वजण आनंदून - सुखावून गेले होते. आपल्या गुरुदेवांनी आदर्श जीवन जगत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या ज्ञानाची मोठी गुंतवणूक करून असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनाला चांगला आकार दिला. सद्भावना, प्रेम, सद्विचार, वासल्य, बंधुभाव या संस्कारासोबतच जीवन जगण्याचे ज्ञान रुजविले. या गुरुऋणातून उतराई होणे अशक्य आहे अशी भावना अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी

 मा.प्राचार्य डॉ.अरुण गाडे व वाल्मिकी विद्यामंदिरचे मुख्याध्यापक मा. अशोक माने यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थी व गुरुदेव कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक व स्वागत समारंभात *माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष मा राजाभाऊ माने म्हणाले* , शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि थोर देशभक्त स्वातंत्र्यसेनानी काकासाहेब चव्हाण या दोन महर्षींच्या पवित्र चरण कमळांनी ही नागटेकडी पुनीत झाली आहे. मी आज ज्या क्षेत्रामध्ये उभा आहे तो या माझ्या कॉलेजमुळेच. विद्यार्थी -विद्याथिनींच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थी मंडळ सर्वतोपरी सहकार्य करील असे ते म्हणाले. कॉलेज परिसरात प्रशस्त क्रीडासंकुल उभारण्याचे माजी विद्यार्थ्यांचे स्वप्न लवकरच पूर्णत्वाला नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी बोलून दाखविला. समाजउपयोगी शिबीरे, व्याख्यानमाला आयोजन, प्रशिक्षण उपक्रम आदी उपक्रमांना महाविद्यालयास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पाहुण्यांचा परिचय 

प्रा.उत्तमराव माने यांनी करून दिला.सुत्रसंचालन प्रा.सुरेश रजपूत, प्रा. सुरेश यादव , प्रा. सचिन पुजारी, श्री. प्रशांत जंगाणी यांनी केले. आभार मा.प्राचार्य आर. के.भोसले यांनी मानले.