याबाबत तक्रारदार माजी सरपंच रवींद्र शिंगण यांनी दिलेल्या माहितीनुसार दि.26 जाने.2020 रोजी ग्रामसभा घेणे कायदेशीर बंधनकारक होते. मात्र शिंगणवाडीचे सरपंच विकास शिंगण व ग्रामसेविका संध्या माने यांनी ती सभा घेतली नाही मात्र दि.28 जानेवारी रोजी ग्रामसभा घेतली व ती 26 जानेवारी रोजी घेतल्याचे खोटे कागदपत्र तयार केले व तसा खोटा अहवाल गटविकास अधिकारी यांना सादर केला होता.
याबाबतची तक्रार मी गटविकास अधिकारी कराड यांच्या कडे सप्टेंबर 2020 मध्ये केली होती त्या तक्रारी वरून गटविकास अधिकारी यांच्या निर्देशानुसार व सहा.गटविकास अधि. श्रीमती साळुंखे व विस्तार अधिकारी पोतदार यांनी ग्रामपंचायत रेकार्ड ची तपासणी केली असता बोगस अहवाल दिला होता हे स्पष्ट झाले व तसा अहवाल त्यांनी गटविकास अधि. यांना दिला होता.
याबाबत जिल्हाधिकारी यांच्यापुढे मार्च 2021 रोजी सुनावणी झाली होती.त्यात सरपंच व ग्रामसेवक दोषी आढळल्याने त्यांनी तक्रारदार यांचा अर्ज मान्य केला सरपंच विकास शिंगण यानाअपात्र करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी 1 आक्टो.2021रोजी दिलेल्या निर्णया नुसार सरपंच व ग्रामसेवक यांनी त्यांना नेमून दिलेल्या कर्तव्यात कसूर करून दप्तरात फेरफार करून बोगस पुरावे तयार करून न्यायालयाची दिशाभुल केली आहे. मुख्य कार्य.अधिकाऱ्यांनी संबधित ग्रामसेवक यांच्या वर शिस्त व अपील अधिनियमांतर्गत खाते कारवाई प्रस्तावित करून चौकशी अंती संबधित सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यात यावा असे म्हटले आहे.