सद्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्यात देव आहे - मुख्यमंत्री


सद्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्यात देव आहे - मुख्यमंत्री


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवर जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले की, सर्वच दिनदर्शिक 'दीन' झाल्या आहेत. सर्वच दिवस सारखे झाले आहेत. रात्री झोपताना प्रत्येकजण आज काय झाले असे विचारतो. सकाळी आज काय होणार, असा प्रश्न करतो. सर्वजण सण-उत्सव बाजूला ठेवत कोरोनाशी युद्ध करत आहेत. देव मंदिरात नाही, देव आपल्यात आहे. लोकांनी जो संयम पाळला त्यामध्ये देव आहे. असे म्हणत त्यांनी सर्वांना बसवेश्वर जयंती, रमजान आणि अक्षय तृतीयेच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर मुस्लिम बांधवांनी रस्त्यावर किंवा मशिदीत जाऊन नमाज अदा करण्याची ही वेळ नसल्याचे लक्षात आणून दिले.
संकटाच्या काळातही काहीजण राजकारण करत आहेत. 
घाणेरडं राजकारण सुरु आहे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणाचे नाव न घेता केली. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. गडकरी यांनी राजकारण बाजूला ठेऊन मदत केली, असे ते म्हणाले.


कोरोनाविरुद्धच्या युद्धात लढताना मुंबई पोलिस दलाचे दोन कॉन्स्टेबल शहीद झाले. या दोघांना मी अभिवादन करतो. माणूस तर गेला आहे. पण त्यांच्यासाठी जे काही करायचे आहे ते सरकार करेल, असा शब्द त्यांनी यावेळी दिला.


सध्या रेल्वे सुरु होण्याची शक्यता नाही. कारण त्यामुळे पुन्हा गर्दी वाढेल. या कामगारांना नंतर घरी जाण्याची सोय केली जाईल. आम्ही केंद्र सरकारशी त्याबाबत चर्चा केली आहे. त्यामुळे गर्दी करु नका, रेल्वे सुरु होणार नाही, असे ते म्हणाले. त्याचबरोबर राज्यातील कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.